
0 Reviews | Write Review
120 / $1.64 120.00 / $ 1.64
Shipping Charges
1. Minimum shipping charges will be Rs. 30/-
2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-
3. Shipping charges for international orders at actual.
Summary of Book
जोतीराव - वास्तविक विचारअंती असें ठरतें की ब्राह्मण लोक हे समुद्राचे पलीकडेच जो इराण देश आहे त्या देशांतील मूळचे राहणारे होत. पूर्वी त्यास इराणी किंवा आर्य लोक म्हणत असत. असे कित्येक इंग्लिश ग्रंथकारांनी त्यांच्याच ग्रंथावरून सिद्ध केले आहे. प्रथम त्या आर्य लोकांनी मोठमोठ्या टोळ्या करून या देशांत येऊन अनेक स्वाऱ्या केल्या व येथील बहुतेक राजांच्या मुलुखात वारंवार हल्ले करून मोठा धिंगाणा केला. पुढे वामनाचे मागून आर्य लोकांचा ब्रह्मा या नावाचा मुख्य अधिकारी झाला. त्याचा स्वभाव फार हट्टी होता. त्याने आपल्या कारकीर्दीत येथील आमच्या मूळ पूर्वजांस रणांगणी जिंकून आपले दास केले; व त्याने आपले लोक आणि हे दास या उभयांतामध्ये हमेशा भेद रहावा म्हणून अनेक त-हेचे नेम बांधिले. ह्या सर्व कृत्यांवरून ब्रह्मा मेल्यानंतर आर्य लोकांच्या मूळच्या नांवाचा आपोआप लोप होऊन त्यांचे नांव ब्राह्मण पडलें, नंतर मागाहून मनूसारखे अधिकारी झाले. त्यांनी बांधिलेल्या नेमांचा धिक्कार मागे पुढे कोणी करू नये, या भयास्तव त्यांनी ब्रह्माविषयीं अनेक त-हेत-हेच्या नवीन कल्पित गोष्टी रचिल्या व त्या गोष्टी ईश्वरेच्छेनेच झाल्या आहेत असा त्या दासांच्या मनावर ठसा उमटावा म्हणून त्यांनी शेषशाईचे दुसरे आंधळे गारूड रचिले आणि संधि पाहून काही वेळाने त्या सर्व लेखांचे ग्रंथ बनविले. त्या ग्रंथाविषयी शूद्र दासांस नारदासारिख्या पटाईत बायकांतील भाऊजींचे टाळ्या पिटून उपदेश केल्यामुळे ब्रह्माचे महत्त्व सहजच वाढलें. आतां आपण ह्या ब्रह्मासारखी शेषशाईविषयी चौकशी करूं लागलों तर त्यापासून आपल्याला काडीमात्र फायदा न होतां आपला उभयतांचा वेळ मात्र व्यर्थ जाणार नाही; कारण त्यांनी मुळीच त्या बिचाऱ्यास उताणे पाहून त्याच्या बेंबीपासून हे चार तोडाचे मूल निर्माण केले आणि अशा मुळीच चीत झालेल्या दीनावर खंब ठोकणे यामध्ये मोठा पुरूषार्थ होईल असे मला वाटत नाही.
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.