Article/Chapter Title :
समकालीन राजकीय परिस्थिती
भगवान बुद्ध
२३-४३
अंगा , मगधा , कासी , कोसला , वज्जी , मल्ला , चेती , वंसा , कुरू , पञ्चाला , मच्छा , सूरसेना , अस्सका , अवंती , गंधारा , कंबोजा , कुल , गण , गणराज्य


या प्रकरणात बुद्ध काळातील सोळा राष्ट्रे आणि आठ कुलांचे वर्णन आलेले आहे. बौद्ध ग्रंथांमध्ये गोतम बुद्धाच्या शाक्य कुलाची माहिती सविस्तर आलेली आहे. या काळात गणराज्य व्यवस्था होती. गणमुख्य गणराज्यात ठरलेल्या कायद्यांप्रमाणे राज्यव्यवस्था चालवीत व न्यायदानाचे कार्य करीत असत. याच काळात अनेक राज्यात गणराज्यांचा नाश होऊन महाराजसत्ता स्थापन होत होत्या. गणराजे वंश परंपरेने सत्तेवर येत होते. त्यामुळे त्यांचा सामान्य जनांवर जुलूम वाढत चाललेला होता.

बुद्ध काळातील सोळा राष्ट्रांची माहिती दिलेली आहे.
या प्रकरणात आठ राजकुलांचे वर्णन केलेले आहे.
बुद्ध काळात गणसत्ताक राज्ये होती.
गणराजे आपली राज्ये ठरलेल्या कायद्यांप्रमाणे चालवीत असत.
गणराज्याचा नाश होऊन बहुतेक राज्यात महाराजसत्ता स्थापन झाल्या.