
0 Reviews | Write Review
10.00 % OFF 162 / $2.29 180.00 / $ 2.54
Summary of Book
वित्तीय अरिष्टे अमेरिकादी विकसित राष्ट्रात उफाळत असतील तर भारतीयांनी त्याची दखल का घ्यावी?
दोन कारणे आहेत (एक) भारताची अर्थव्यवस्था, बँकिंग व वित्तक्षेत्र जागतिक अर्थव्यवस्था, बँकिंग व वित्तक्षेत्राशी वेगाने एकजीव होत आहे. कॉम्प्युटर्स व टेलिकम्युनिकेशनमुळे एका राष्ट्रातील वित्तक्षेत्रातील अरिष्टाची आग क्षणार्धात हजारो किलोमीटरवरील दुसऱ्या राष्ट्रात काही मिनिटात पोचत आहे. (दोन) फायनान्शियल इन्क्ल्य जनसारख्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमामुळे बॉटम ऑफ पिरॅमिडमधील कोट्यवधी नागरिक देशातील औपचारिक वित्तक्षेत्रात सामावले जात आहेत.
या दोन्हीमुळे जागतिक वित्तक्षेत्रात घडणारी प्रत्येक बरीवाईट घटना भारत व भारतातील सामान्य नागरिकांवर बरावाईट परिणाम करणार आहे. त्यापासून कोणीही वाचू शकत नाही. वित्तीय अरिष्टांमुळे त्या राष्ट्रातील अगणित कुटुंबे, लघुउद्योग, कंपन्या, बँका दिवाळखोरीत जातात: कायमच्या नामशेष होत असतात. त्यातून रोजगार बुडणे, बँकांतील ठेवी बुडणे होतेच. त्याचबरोबर केंद्र सरकारला सार्वजनिक पैशातून हजारो कोटी रुपयांची बेलआऊट पॅकेजेस देणे भाग पडते, जो पैसा खरे तर सामान्य नागरिकांच्या लोककल्याणांसाठी कामी येऊ शकतो. स्वतःचे भौतिक व वित्तीय हितसंबंध जपायला शिकायचे असेल तर सामान्य नागरिकांनी हा व असे विषय समजून घेण्याची तातडी आहे.
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.