
0 Reviews | Write Review
350 / $4.93 350.00 / $ 4.93
Summary of Book
नारायण मेघाजी लोखंडे यांनी एकाच वेळी कामगार आणि शेतकऱ्यांचा लढा हाती घेऊन शोषित जात-वर्गांच्या बाजूने अभूतपूर्व वैचारिक व संघटनात्मक बांधणी केली होती आणि या बांधणीच्या बळावरच शोषित मागासजातीय समाजाचे जातीविरोधी समतावादी लढे आणि शेतकरी, शेतमजूर, कुळ-कामगारांचे वर्गीय लढे एकत्र लढले जावू शकतात, याचे कम्युनिस्टपूर्व उदाहरण या देशात निर्माण करून ठेवले होते. या तिन्ही पातळ्यांवर लढताना व काम करताना त्यांना कोणत्याच वर्गीय व जातीय जाणीवा त्यांच्या कार्यात आडव्या येत असल्याचे जाणवले नव्हते. उलट त्यांच्या सत्यशोधकी विचारसरणीमुळे या तिन्ही पातळ्यांवर ते यशस्वीपणे कार्य करू शकले होते. आपल्या देशात १९२० नंतर आलेल्या कम्युनिस्ट चळवळीला मात्र नारायण मेघाजी लोखंडेंनी जपलेला वर्गीय-जातीय संघर्षाचा हा सांधा टिकवून ठेवता आला नाही. म्हणून उत्तरोत्तर कम्युनिस्ट चळवळ एकांगी बनत जावून आज या चळवळी मृतप्राय झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत. योग्य विचारसरणीशिवाय कोणताही लढा यशस्वीपणे लढला जावू शकत नाही. कम्युनिस्टांची केवळ वर्गीय विचारसरणी ही आपल्या देशात ज्याप्रमाणे अपयशी ठरत आहे. त्याचप्रमाणे दलित चळवळीची निव्वळ जातीय विचारसरणीही आपल्या देशात मूळ धरू शकत नाही, हे आता स्पष्ट झालेले आहे. अशा वेळी जातीय व वर्गीय या दोन लढ्यांना एकत्र ठेवणारा सत्यशोधक विचार आपल्या देशात यशस्वी होऊ शकतो हा नारायण मेघाजी लोखंडेंच्या चळवळीचा निष्कर्ष होता व त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या विविध वर्गीय व जातीय चळवळींनी तो पुरेपूर सिद्ध झालेला दिसून येतो.
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.